Wednesday, June 25, 2008
आरोपींच्या पिंजरयात संभाजीमहाराज
हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी राजे यांच्याविषयी गेली उणीपुरी दोनशे वर्षे जे गैरसमजांचे पिक आले आहे,त्याला कारणीभुत ठरलेली मल्हार रामराव चिटणीसाची बखर उत्तर पेशवाईत रचली गेली.मराठे शाहीच्या ह्रासाचा व नैतिक अधःपतनाचा काळ म्हणून जो कलंकित झालेला तो दुसरया बाजीरावाचा हा काळ कुलीन स्त्रियांची अब्रू जिथे धोक्यात होती.व चवचाल सरदार तसेच त्यांचा टवाळखोर रखेल्यांचा व बायकांचा घटकंचुकीसारख्या मुक्त लेंगीक चाला त्या कालात राजेरोसपने चालत असे.
आरोपांची जंत्री .
संभाजी राजांचा अभिशिक्त युवराज म्हणुन हिंदवी स्वराज्याच्या प्रजेने स्वीकार केल्या नंतर ही त्यांच्या संबंधीच्या कंडया पिकविन्याची कुटिल कारस्थाने ब्राह्मणमंत्र्याकडून चालु होती.
आरोप- शिवरायावर विषप्रयोग
या पूर्वी ज्या आरोपांचा उल्लेख केलेला आहे,त्याही पेक्षा अतिशय भयानक स्वरूपाचा आरोप म्हणजे दस्तूरखुद्द शिव छत्रपतिंवरील विषप्रयोगाचा...तो एका मुंबईकर इंग्रज पत्रकाराने सुरतेला पाठविलेल्या पत्रात केला आहे.या पत्रात संभाजीने शिवाजीला विषप्रयोग केल्याचे लोक बोलतात,असा आरोप केलेला आहे.या प्रकारची अफवा संभाजीला राज्य मिलु नये म्हणुन ब्राम्हणमंत्र्यानी पसरविली असावीत व त्यामागे लोकांची मने कलुषित व्हावीत हां उद्देश असावा असे डॉ. कमल गोखले ह्यानी म्हटले आहे (संदर्भ - २)
आरोप- बदफैलीपणाचा..
एखाद्या प्रभावी व्यक्तिमत्वाला नामोहरम करन्याकरता फारशी उठाठेव न करता वापरण्यात येणारे शस्त्र म्हणजे त्याचे चारित्र्यहनन...
आरोप- सोयराबाईला भिंतीत चीणुन मारले.
संभाजी राजांविषयी हा फार मोठा गैरसमज जनमाणसात रुजलेला आहे व त्याचे स्वरुपही आरोपाचे आहे.म्हणून आपण या मागील तथ्य समजावून घेतले पाहिजे .चिटनिसाने हा आरोप केला आहे.तो म्हणतो,"सोयरा बाई साहेब यांज पाशी जावून बाई साहेब कोठे आहेत म्हणून बहुत क्रोधे करून विचारिले ,तेसमायी जवलिल बायका सर्व भये करून निघाल्या "
Subscribe to:
Posts (Atom)